Skip to main content

Posts

Featured Post

लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया : आमदार प्रशांत ठाकूर

  पनवेल,दि.25 : लोकशाही भक्कम करण्यासाठी आपण एकत्र येऊया, लोकशाही जागृत ठेवण्याच्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करत राहूया, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.   केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आणीबाणी कालावधीत लोकशाहीचा लढा व बंदिवास भोगावा लागलेल्या मान्यवरांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 25 जुन रोजी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यातआले यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले,आणीबाणीच्या काळात लोकशाही पुर्नप्रस्थापित करण्यासाठी , त्यावेळी जे अन्याय अत्याचार सुरू होते, ते थांबविण्यासाठी ज्यांनी सक्रिय भूमिका बजावली अशा मान्यवरांच्या कर्तृत्वाचा अभिमान पनवेलकरांना आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.       या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यांमध्ये बंदिवास भोगावा लागलेले 7 मान्यवर,आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे ,उपायुक्त सर...
Recent posts

खारघर वाहतूक पोलिस शाखेचा अनोखा उपक्रम

  वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध पनवेल प्रतिनिधी :  वाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन दंड आकारला जातो. तो आकारलेला दंड भरायचा कुठे माहिती नसल्यामुळे वाहन चालक चालकांचा वेळ वाया जात  होता ही बाब लक्षात घेऊन           खारघर उड्डाणपुला खालील  मंकी पॉईंट येथील वाहतूक चौकी येथे वाहनचालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा  खारघर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वाहन चालक आपल्याविरोधातील प्रलंबित दंड तपासू शकतात तसेच तिथेच दंडाची रक्कम भरू शकतात.          वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना पोलीस ठाणे किंवा इतर कार्यालयात जावे न लागता थेट चौकीवरच आवश्यक ती कारवाई पूर्ण करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल या राबवत असलेल्या मोहिमेचे वाहन चालकांनी खारघर वाहतूक शाखेचे कौतुक केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे

 सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद  मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.            या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेत...

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास कटिबद्ध - माजी सभागृहनेते परेश ठाकूर

  पनवेल (प्रतिनिधी) घोटगावाला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी तसेच परीरातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरीकांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भाजप काम करेल अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी घोट येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.        दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे युवानेते नितेश पाटील यांच्यावतीने घोट गावातील नागरीकांना मोफत छत्री आणि परिसरातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच यावेळी घोट गावाजवळ सुमारे १२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन, १२ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीमधून साकारण्यात येणाऱ्या कोयनावेळे ते आरटीओ पर्यत्ताच्या रस्त्याच्या डांबीकरणाच्या कामाचे आणि सुमारे ९ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी भूमिपू...

महेंद्रशेठ घरत यांच्याकडे संपूर्ण कोकणाची जबाबदारी सोपवा;जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी

  शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न उरण दि १९(प्रतिनिधी)-"महेंद्रशेठ घरत हे काॅंग्रेसचे निष्ठावंत जिल्हाध्यक्ष आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यांच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व हे सर्वच गुण आहेत. साम, दाम, दंड भेद या नीतीचा वापर करण्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे कोकणाची संपूर्ण जबाबदारी महेंद्रशेठ घरत यांच्याकडेच द्या," अशी रायगड जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या सर्वच पदाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील शेलघर येथे गुरुवारी (ता. १९) मागणी केली. "काॅंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. जे लोक काॅंग्रेसला सोडून गेलेत, ते स्वार्थी होते. रायगडमध्ये नव्याने काॅंग्रेस पक्ष उभा करायचा आहे. त्यासाठी येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील. महेंद्रशेठ घरत यांच्यावर लवकरच योग्य जबाबदारी सोपविण्यात येईल," असे काॅंग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश हे शेलघर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव, कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश, महाराष्ट्र प्रदेश काँ...

भाजपची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न

  पनवेल (प्रतिनिधी) गेल्या ११ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. 'संकल्प से सिद्धि तक' या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित, केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भाजपा महाराष्ट्र प्रदेशने हाती घेतला आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे-कोकण विभागीय आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाली. या बैठकीत कोकणातील संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील व्यवस्थापन तसेच लोकांपर्यंत प्रभावीपणे संवाद साधण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली.  कमळ हे केवळ चिन्ह नसून, भाजपाच्या विचारसरणीचे प्रतीक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वेशात कमळ परिधान करून अभिमानाने भाजपा प्रतिनिधित्व करावे. आणि मोदी सरकारच्या विकासकार्यांचा घरोघरी प्रचार करणे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचे दायित्व समजून पार पाडावे अशा सूचना उपस्थितांना करण्यात आली. हे अभियान म्हणजे केवळ ...

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात

  १६ शाळांमधील सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग  पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य आणि नेतृत्वगुणांची जोपासना व्हावी या हेतूने ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ २३ जूनपासून भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित केली आहे. यावर्षी स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे.              हि स्पर्धा वर्ग अंतर्गत फेरी, शाळा अंतर्गत फेरी आणि शालेय अंतिम फेरी होणार असून निवडक ६०० स्पर्धकांमधून अंतिम ६० विजेते ठरणार आहेत. मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही तितक्याच उत्साहात स्पर्धा पार पडणार आहे. १६ शाळांमधून सुमारे १३ हजार विद्यार्थी सहभाग घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, चांगू काना ठाकूर विद्यालय (इंग...